भारतीय सैन्याकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ले

  • पहलगाम हल्ल्याला भारताचे चौदा दिवसानंतर प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी आज, बुधवार पहाटेपासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे हल्ले पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर केंद्रित होते, ज्याचा उद्देश सीमापार दहशतवादी कारवायांच्या मुळावर घाला घालणे हा आहे.
या ‘लक्ष केंद्रित हल्ल्यां’मध्ये (focused strikes) भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ आणि त्यांच्या लॉजिस्टिक केंद्रांना लक्ष्य केले. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले अत्यंत अचूक होते आणि यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप नागरिकांवरील भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने त्वरित आणि निर्णायक कारवाई केली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.


या कारवाईमुळे सीमापार दहशतवादी संघटनांना एक कडक संदेश गेला आहे की, भारताच्या शांततेला आणि अखंडतेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. भारतीय सैन्याच्या या धडक कारवाईचे देशभरातून स्वागत होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE