रत्नागिरीत : ३७ व्या किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा शुभारंभ रविवारी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.स्थानिक, राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगले यश मिळवा. खेळाडूंनी ऑल राऊंडर व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी यावेळी केले.

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनकडून या स्पर्धेचे भव्यदिव्य अशा स्वरूपाचे आयोजन केलेले आहे. कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या काळानंतर अशापकारची ही मोठी स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनपसंगी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, सीईओ कीर्तीकुमार पुजार, भारतीय खो-खो संघटनेचे सहसचिव इंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो सहसचिव गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्प बाळू साळवी, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, तसेच राजेंद्र चव्हाण, यांच्यासह राज्य खो खो असोसिएशनचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, तसेच रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी यांची पमुख उपस्थिती होती.स्थानिक, राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगले यश मिळवा. खेळाडूंनी ऑल राऊंडर व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी यावेळी केले.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनकडून या स्पर्धेचे भव्यदिव्य अशा स्वरूपाचे आयोजन केलेले आहे. कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या काळानंतर अशापकारची ही मोठी स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनपसंगी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, सीईओ कीर्तीकुमार पुजार, भारतीय खो-खो संघटनेचे सहसचिव . इंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो सहसचिव गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्प बाळू साळवी, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, तसेच राजेंद्र चव्हाण, यांच्यासह राज्य खो खो असोसिएशनचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, तसेच रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी यांची पमुख उपस्थिती होती.














