रत्नागिरी, दि.१६ : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ना. शिंदे यांची ही पहिलीच रत्नागिरी भेट असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्रीगण, प्रशासन आणि पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

विमानतळावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.
यावेळी पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री महोदयांना सलामी देण्यात आली.















