उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : ठाणे जिल्ह्यातील शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे कट्टर, एकनिष्ठ, प्रामाणिक पदाधिकारी, ठाणे जिल्हाध्यक्ष वैशालीताई लाठे (४५ )यांचे रविवारी ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
वैशालीताई लाठे या २०१३ पासून शिवा संघटना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर वीरशैव लिंगायत व बहुजन समाजातील महिलांना संघटित करण्यासाठीच तसेच राज्यभरामध्ये समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक आंदोलनात आणि सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी असायच्या.
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचे अगदी विश्वासू पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येकाच्या सुख दुःखात दिसणारे, प्रत्येक आंदोलन, संपात सहभागी असणाऱ्या वैशालीताई लाठे यांनी आज रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजता राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे असे अचानक जाण्याने ठाणे जिल्ह्यातील शिवा संघटना व वीरशैव लिंगायत समाजामध्ये प्रचंड शोककळा पसरली
