हातखंब्याजवळ एस. टी. बसने दोन वाहनांना ठोकरले

रत्नागिरी : रत्नागिरी -नागपूर महामार्गावर हातखांब्याजवळ पानवळ येथे तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एसटी बसने पुढे असणाऱ्या दोन वाहनांना मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी दुपारी गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार रत्नागिरीहून  कोल्हापूरच्या दिशेने जाणारी रत्नागिरी-कोल्हापूर-गडहिंगलज ही एसटी बस पानवळ स्टॉप जवळ आली असता पुढे असणारी किया कार (MH 08 AX 5655) गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर एसटीने धडक दिलेली कार पुढील इनोवा (MH 08AG 0281) गाडीवर धडकली. अशी तीन वाहने मागोमाग माग जोरदार धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एक ही व्यक्ती जखमी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीने धडक दिलेल्या या किया गाडीचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे. 

अपघातांची माहिती मिळताच घटनास्थळी हातखंबा वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. काहीकाळ वाहतूक थांबली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE