ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेने १६३ मुलांचे घडविले कुटुंबीयांशी पुनर्मिलन!

मुंबई : आर पी एफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.

सुटका करण्यात आलेल्या या १६३ मुलांमध्ये १३३ मुले आणि ३० मुलींचा समावेश असून त्यांना चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांची त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून देण्यात आली आहे आहे.


सुटका करण्यात आलेल्या या १६३ मुलांपैकी विभागनिहाय विभाजन पुढीलप्रमाणे आहे

1) मुंबई विभाग- ३४ मुले (२३ मुले आणि ११ मुली)
2) भुसावळ विभाग- ७८ मुले (७० मुले व ८ मुली)
3) नागपूर विभाग- १४ मुले (५ मुले आणि ९ मुली)
4) सोलापूर विभाग- ४ मुले (२ मुले व २ मुली)
5) पुणे विभाग- ३३ मुले (३३ मुले).

घरगुती भांडणामुळे अगर काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवान कडून शोधून काढतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE