तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल
रत्नागिरी, दि. १६ : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
