लांजातील शिरवली गावात गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली गावात गवारेड्यांनी नी भातशेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, या गवा रेड्यांना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर शेतकऱ्यांकडून होत आहे.

काल शुक्रवारी शिरवली गावात पाच गवा रेड्यांचा कळप दिसून आला. गेले काही दिवस या परिसरात गवारेडे यांचे वास्तव्य आहे. पोलीस पाटील प्रसाद राजाकर यांनी लांजा व विभागाला याची माहिती दिली आहे. वनरक्षक श्रावणी पवार यांनी शिरवली गावात भेट दिली. गवारेड्यांनी शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी फटाके वाजवून पिटाळून लावले जात आहे. मात्र पुन्हा पुन्हा हे गवारेडे भात शेतीकडे वळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE