कोकण रेल्वेचे वाहतूक तीन तास विस्कळीत

  • ओव्हरहेड वायरमधील बिघाडामळे घटनास्थळावरून धावणाऱ्या ११ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
  • दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसलाही बसला फटका
  • तेजससह मुंबईकडे जाणारी
  • वंदे भारत एक्सप्रेसही अडकली

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्यांचा खोळंबा झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.


या संदर्भात प्राप्त माहितीनुसार हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही मंगला एक्सप्रेस वेरवली येथे आली असता गाडीचा पॅन्टोग्राफ हा ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेमध्ये अडकून ती तुटल्यामुळे ओरड वायरमध्ये बिघड निर्माण झाला. यामुळे त्रिवेंद्रम ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस, मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह 11 गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर साडेतीन तास विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सुरू झाली. रेल्वे वाहतुकीतील बिघाड दूर केल्यानंतर अडकून पडलेली राजधानी एक्सप्रेस घटनास्थळावरून  सर्वात आधी  रवाना झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE