- पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
- आम्ही विकासाच्या दिशेने प्रवेश केला असल्याचे कार्यकर्त्यांनी दिली माहिती
रत्नागिरी : शिवसेनेला रत्नागिरीमध्ये बहर येत असून वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. परिसरातील विकास आणि गावाचा विकास या उद्देशाने विचार करत मिरजोळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे मिरजोळे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा गट मजबुतीकडे जात असल्याचे दिसत आहे. आम्ही गेले अनेक वर्ष एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र परिसर आणि गावाचा विकास खुंटत गेलाच दुःख यावेळेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. गावाचा विकास आणि परिसरातील गावांचा विकास करायचा असेल तर ना. उदय सामंत यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आम्ही ना. उदयजी सामंत यांच्या वरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी प्रवेश करण्यामध्ये अक्षय कीर, प्रितेश पंडे दिनेश पुसाळकर, सुरज गुरव समीर भाटकर रघुनाथ भाटकर प्रथमेश गुरव अमोल तांबे रोहित मालप, विराग गुरव, सिद्धेश गुरव, साईज घवाळी, सक्षम भाटकर, अमित कळंबटे, सुदेश मयेकर अनिकेत गुरव, अथर्व जोशी, संतोष मयेकर,शुभम घवाळी, श्रेयश घवाळी पंकज मालप, प्रणय गुरव या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी किरण उर्फ भैया सामंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवा जिल्हा प्रमुख केतन शेट्ये, मुन्ना देसाई, संजय हळदणकर (युवा सेना विभाग प्रमुख) हर्षराज पाटील, (ग्रामपंचायत सदस्य)- रत्नदीप पाटील,(युवासेना शाखा प्रमुख) प्रथमेश पाटील, (शिवसेना शाखापमुख)- दिनेश पाटील, ( युवासेना उपशाखाप्रमुख )-ओंकार मजगावकर, (युवासेना शाखाप्रमुख )-सुमित मयेकर सर्व मिरजोळे ग्रामस्थ मान्यवर- शरद शेठ पाटिल प्रवीण पवार, प्रीतम चव्हाण, सुमित मयेकर, विजय पाटील चेतन पाटील मिलिंद पाटील नंदू घवाळी उमेश पाटील संतोष कीर, विजय मयेकर बंडू नाखरेकर सचिन पवार.आदी उपस्थित होते.
