- राज्य शासनाने काढले परिपत्रक
मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना राज्य शासनाकडून त्वरित प्रतिसाद दिला जाणार आहे.

नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींविषयी माध्यमांमधील बातम्यांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने शासनाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र माहिती महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी दिली आहे.

