Ultimate magazine theme for WordPress.

वादळग्रस्त स्व. सुनंदाबाई घरत यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत!

0 55

प्रकरण दडपले गेल्याचा कुटुंबियांचा आरोप


उरण (विठ्ठल ममताबादे ) : मागील वर्षी 17 मे 2021 रोजी संपूर्ण रायगड जिल्ह्यात तोक्ते वादळ सुटले होते. या दिवशी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान उरण शहरातील गणपती चौकामधील राममंदिर येथे चालू असलेले राम मंदिराच्या कामामुळे, या मंदिरावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यावरच्या मजल्यावर रचून ठेवलेले सिमेंटचे विटाचे ब्लॉक अचानक खाली पडून भाजी विक्रेते महिला सुनंदाबाई भीमनाथ घरत व नीता नाईक या उरणमधील दोन महिलांचा या घटनेमुळे दुर्दैवी अंत झाला होता.

राम मंदिरा बांधकाम करताना कोणतेही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मंदिराचे भिंत अंगावर पडल्याने सदर महिलांचा मृत्यू झाला.17 मे 2022 रोजी या घटनेला 1 वर्षे पूर्ण झाले. मात्र अद्यापही पोलीस यंत्रणेकडून कोणतेही हालचाल झाली नाही.हे प्रकरण दडपले गेले असल्याचा  आरोप कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे.

यातील आरोपी हे अजूनही मोकाटच फिरत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.स्व. सुनंदाबाई भीमनाथ घरत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी उरण मधील सामाजिक कार्यकर्ते व सुनंदाबाई घरत यांचे पुत्र चंद्रकांत भीमनाथ घरत व घरत कुटुंबियांनी केली आहे.सदर घटनेतील जबाबदार व्यक्तीस अजूनही अटक न झाल्याने व घरत कुटुंबियांना न्याय न मिळाल्याने घरत कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.