Ultimate magazine theme for WordPress.

१४ जुलैपर्यंत वादळी वारे वाहण्याचा इशारा

0 28

रत्नागिरी दि.११: भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, दिनांक १० जुलै ते १४ जुलै २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४५-५५ कि.मी ते ६५ कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारानी संबधीत कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. ११ जुलै २०२२ ते १५ जुलै २०२२ या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली
आहे.

तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.